विजय शिंदे
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीच्या बैठकीमधील निर्णयानुसार उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
भीमा नदी काठच्या गावात पिण्याचे पाणीपुरवठा योजनेसाठी उद्या ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता धरण विद्युतगृह मधून सुरुवातीला १६०० इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे नंतर टप्प्याटप्प्याने वाढ करून ६०० इतका करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सुरक्षितच्या दृष्टीने धरणाखालील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापक विभागाचे कार्यकारी अधिकारी रा पो मोरे यांनी दिला आहे.